हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

चोरा चोरी

कोण कोणाचे काय चोरेल हे अजिबात सांगता येत नाही .... सुरुवातीला 'बोक्या सातबंडे' प्रकरणाने मराठी ब्लॉगर्स समूहाला (हो म्हणजे काय ! हा साहित्यिक समूहा पेक्षा मोठा आहे) हादरवून टाकले होते .... नंतर नंतर ह्या घटना इतक्या वारंवार होऊ लागल्या कि 'आपले साहित्य चोरणे' म्हणजे 'वाह्ह व्वा !' सारखी एक पोहोच पावतीच झाली.... माझ्या कविता किंवा लिखाण हे चोरण्या सारखे असेल हे आमच्या तिर्थरुपांना पण कधी वाटले नाही (आणि अजूनही वाटत नाही !)असो .... तरी कधी कोणी पांचट आवडीच्या आणि अकलेच्या माणसाने हे कृत्य केलेच कि आम्ही ओरडून ओरडून सांगतो 'आमचे साहित्य चोरले' म्हणजे 'वाचा वाचा मी किती उत्कृष्ट लिहितो!' हे सांगणे असते.... मग आमच्यातले जेष्ठ श्रेष्ट लोकं सांगतात 'अरे शब्द चोरेल !! प्रतिभा थोडीच चोरू शकेल??'  (हो च्याला ते चोरू शकले असते तर कसला भाऊ नी कसला फळा)....
पण आज जेव्हा एकाने मला टोमणा मारला 'काय हो पंताची 'कंसातली'  स्टाइल चोरता का?' तेव्हा पहिल्यांदा जिव्हाग्री लागले !!!! ..... खरे आहे मी पंतांची स्टाइल उचलली , कारण मित्रांची गोष्ट हि उचलायची असते, ती चोरी नसते ....
माझ्या ब्लॉगिंग ची सुरुवात मुळात पंतांचे उवाच वाचता वाचता झाली .... पुढे 'मराठी भुंगा' डोक्यात घुमायला लागल्यावर 'काय वाटेल ते' लिहायला आणि 'वटवट' करायला लागलो.... इथे तिथे 'भटकंती' करता करता 'मोगरा फुलाला' पाहू लागलो .... 'मनाचे बांधकाम' पहिले 'बाबाच्या भिंतीवर' उड्या मारल्या.... 'पाटी माझी पटेल का?' बोलणार्यांची पाटी पाहिला लागलो .... आणि बर्याच गोष्टी करताना 'मन उधाण वाऱ्याचे' करून सुचेल ते जमेल ते लिहायला लागलो ....
आता कोणा कोणाचे काय उचलले किंवा चोरले ते सांगणे कठीण ...... हां पण प्रयत्न करून सुद्धा कोणाची प्रतिभा मात्र चोरू शकलो नाही .....
आपला,
(उनाड) विशुभाऊ
ता.क. : जे काय लिहिले आहे, ते मुळात सगळ्यांना कळणार नाही .... त्या बद्दल क्षमस्व!

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

हा खेळ पैश्यांचा....

कंपनीत खेळ चाले, या गूढ संख्यांचा 
संपेल न कधीही, हा खेळ पैश्यांचा 

हा बॉस ना स्वयंभू, उगाच ज्ञान वाटतो हा 
इन्फ्लेशन मध्ये अभिशाप भोगतो हा 
यशात घेई भागीदारी, हा दूत असुरांचा 

आभास ऍप्रेजल हे असते खरे गाजर 
जे इन्क्रिमेंट मिळे ते, असतो नितांत भास 
अनंदतात बाकीचे, हा दोष त्या बावळटांचा  

या साजिर्या क्षणाला, प्याला असावा मुठीत 
ओठांवरील सर्व शिव्या, लागतील त्याला खचित 
गवसेल का सूर अपुल्या?, 'अझाद' जीवनाचा .....
 
आपला,
(नोकरदार) विशुभऊ 

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

परदेशी प्रत्यक्ष निवेश (FDI)

पैसा साक्षप्तेच्या नियमा नुसार 'पैसा निर्माणही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, त्याचे एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतर किंवा देशातून परदेशात स्थलांतर करता येते' .... पैसा खाणे म्हणजे कोणत्याही सरकारी प्रक्रियेत स्वार्थ साधण्यासाठी पैस्याचे केलेले रुपांतर किंवा स्थलांतर होय !.... रुपांतरीत पैसा संचित करणे धोकादायक असल्याने मुख्यत्वे त्याचे स्थलांतर केले जाते .... राजकारणातल्या अलिखित नियमानुसार रुपांतर आणि स्थलांतर हि प्रक्रिया आपल्या ५ वर्षांच्या राजवटीतील पहिल्या ३ वर्षात करायची असते ...... पुढील १ वर्षात त्यातील काही पैसा देशात परत आणून पैसा निर्माण केल्याचा भास करावा व पुढे येणाऱ्या निवडणुकी साठी जनसमर्थन मिळवावे....
परदेशी प्रत्यक्ष निवेश हि योजना स्थलांतरित पैसा परत आणण्यासाठी सर्वात्कृष्ट पध्दत आहे .... आपल्या जवळील नातेवायाकांना परदेशी स्थाईक करून त्यांचा तर्फे परदेशी कंपनी बनवावी व स्थलांतरित पैसा पुन्हा 'परदेशी प्रत्यक्ष निवेश' योजने मार्फत देशात आणून , देशाची आर्थिक बाजू सावरावी आणि होणारा नफा पुन्हा होता तिथे घेऊन जावा....
वरील दिलेले नियम आणि प्रक्रिया ह्या परीक्षित असल्या तरी विशेषज्ञांच्या मार्गदर्शना खालीच पार पाडाव्यात ..... घटने मुळे घडलेल्या आकस्मित घटनेला विशुभाऊ जबाबदार राहणार नाहीत !!!
आपला,
(अर्थतज्ञ) विशुभाऊ

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

उचकी

भर दुपारी स्वप्नातील खडखडाटने दरवाजा उघडला
पहिले तर घरचे
भारतातून
आले होते
येताना मोदक, पुरणपोळ्या आणि वालाची खिचडी आणली होती
ती ह्या गणपतीतील माझी वाटणी होती ....
डोळे उघडले तर पहिले घरात कोणी नव्हते
ताट खरकटे होते
पुरणाची चव जिभेवर होती
माहित आहे आईला आज उचकी लागली होती .....
आपला,
विशुभाऊ

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

माझी गांधीगिरी


आज माझ्यातल्या सरळ स्वभावाची प्रचीती मलाच झाली ..... इथे सिंगापूर मध्ये फास्टफूड सेन्टर्स मध्ये खाउन झाल्यावर स्वतःचे ट्रे उचलण्याची पध्दत नाही .... पण घराच्या शिस्ती मुळे मी स्वतःचे ट्रे स्वतः उचलतो , बायकोच्या शिस्तीचा प्रभाव कमी असल्याने धुवून ठेवत नाही ......

आज सबवे मध्ये दुपारचे जेवण घेतल्यावर सवई प्रमाणे ट्रे उचलला आणि निघालोच .... तोच एका दाम्पत्याने मला त्यांच्या टेबल वरच्या ट्रे कडे बोट दाखवून म्हटले "प्लीज क्लीअर धीसला!".... मी त्यांच्या कडे पाहून हसलो व त्यांच्या टेबल वरचे ट्रे सुध्दा उचलत होतो, तोच सबवे मधला कर्मचारी "सोर्री सोर्री" करत ओरडत आला व त्या दाम्पत्यांना म्हणाला "सर इज आवर कस्टमर" आणि माझ्या हातातले ट्रे खेचून घेतले.... त्या दाम्पत्यांना मेल्याहून मेल्या सारखे झाले होते .... त्यांच्या "सॉरी" चा मान झुकवून स्वीकार केला व काढता पाय घेतला...

धावत धावत ऑफिस च्या वाशरूम मध्ये गेलो व ५ मिनिटे स्वतःला न्याहाळत होतो .... तेव्हा कळले माझ्या हिरव्या टी-शर्ट आणि ओफ्व्हाईट प्यांट ची करामत होती हि ......

आपला,

(समाजसेवक) विशुभाऊ

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

सिंग्लीश

सिंगापूर म्हणजे जागतिक व्यापाराची राजधानी .... आणि ह्या देशाची प्रथम भाषा 'इंग्रजी' असली तरी इथे तर्खडकर आले असते तर पावला पावला ला जीव दिला असता त्यांनी !!!
इथेले इंग्रजी म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय .... कोणत्या भाषेची वाक्यरचना मनात करून इंग्रजी बोलतात ते देवालाच ठाऊक .... आता खाली दिलेली उदाहरणेच पहा ....
एका प्रोडक्शन कंपनीच्या सुपरवायजरला त्याचा मॅनेजर नवीन कामावर घेतलेल्या कामगाराकडे बोट दाखवून विचारतो " हि नो ओर नो ?" ..... ह्याचा अर्थ असा कि ' दॅट पर्सन नो (Know) हिज वर्क ओर नॉट (no) !' .....
ह्यांच्या व्याकरणात क्रियापदांची व्याख्याच निराळी आहे . . .  म्हणजे कुठे क्रियापद लावता आले नाही कि तिथे 'ला' लावायचे .... " नो प्रॉब्लेमला" "वन डॉलर एक्सट्रॉला" वगैरे वगैरे . . . .
आणि सगळ्यात मजा येते ती "कॅन कॅन" मध्ये . . .  जिथे आपण मराठीत 'चालेल' 'होईल' किंवा इंग्रजी मध्ये 'विल डू' 'कॅन बी डन' वगैरे म्हणतो तिथे हि लोकं 'कॅन कॅन' म्हणतात . . . .
तरी इथल्या इंग्रजी मध्ये ब्रिटीश इंग्रजी सारखा रुक्ष पणा नसून उर्दू सारखी एक नजाकत आहे . . .  म्हणूनच आम्ही ह्या भाषेला 'इंग्लिश' नव्हे 'सिंग्लीश' असे म्हणतो .....
आपला,
(सिंग्रजी) विशुभाऊ

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

:: भारुड ::

लवकर पाव गं  मला | भारत आई रोडगा वाहिन तुला ||१||
किटली आमची इटलीतून आली | इकडेच खपव गं तिला ||२||
सरदार आमचा कोळसा खातो | अतिसार होऊ दे त्याला ||३||
जावई ह्यांचा गोळीबार करतो | फाशी होऊ दे त्याला ||४||
बारामतीचा बोका खाव खाव करतो | कॅन्सर होऊ दे त्याला ||५||
भ्रष्टाचार मारून आहुती देईन | 'अझाद' कर गं मला ||६||
एकदाचे शेवटी सगळेच जाऊ दे । फक्त सज्जन राहू दे आम्हा ||७||
आपला,
(भारुडी) विशुभाऊ

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१२

मेला मेली

आज ऑफिस मधून निघता निघता , फ्रेंच बॉस च्या चायनीज सेक्रेटरीचा फोन आला ....
ती : बॉस इज सेन्डिंग यु मेल ....
मी : टेल हिम आय नीड फिमेल ! ;-)
ती : आय एम फिमेल !!
((((((( ठ्ठो )))))))
आपला ,
(खल्लास) विशुभाऊ

रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

रॉ आणि आय.एस.आय

अब्बास अहमद हा टिपिकल पाकिस्तानी , पण सिंगापुरातला माझा मित्र ..... खरेतर माझ्या टीम मधला नसला तरी मी भारतीय म्हणून आत्मीयतेने (!) माझ्याशी मैत्री करायला आला .... अब्बास म्हणजे आर्धवट डोक्याचा पण लाघवी मुलगा .... पाकिस्तानी असून सुध्दा बराच ब्रॉडमाइंडेड आहे.... हा मला 'रॉ' अशी हाक मारतो, जणू काही ती शिवी आहे आणि म्हणून मी त्याला 'झाटू आय.एस.आय' आशी हाक मारतो (शिवी देण्या साठीच)..... कॉफी ब्रेक मध्ये आम्ही शाब्दिक भारत-पाकिस्तान लढाई खेळतो .... आणि आपणच जिंकलो असे समजून दोघेही कामाला लागतो ..... असे असले तरी आजून एक ब्रिटीश कलीग 'जॉन मेल्बॉर्न' आमचा कॉमन दुश्मन..... अब्बास हा पंजाबी ऍक्सेन्ट मध्ये उर्दू बोलतो आणि त्याच्या भाषेवर बॉलिवूड च्या सिनेमांचा बराच प्रभाव आहे आणि मी मराठी ऍक्सेन्ट मध्ये मुंबई मधल्या सर्व भाषांचा प्रभाव घेऊन हिंदी मिश्रित उर्दू बोलतो ....
त्या दिवशी आम्ही दोघे रॉ आणि आय.एस.आय लढाई लढाई खेळत होतो ...
अब्बास : दोस्त तू कितनाभी मना करे .... कारगिल तो हम ही जीत गये थे !!!
मी : भोसडिके इसका मतलब पाकिस्तान ने ऍटॅक किया था ये तुम काबुल करते हो !
अब्बस : नहीं नहीं मेरा मतलब ये था की ......
अब्बास शब्दांची सारवा सराव करत असतानाच ब्रिटीश बुलडॉग  जॉन तिथे आला ....
जॉन : यु पिपल आर फ्रोम डिफरन्ट कन्ट्रीज बट स्पिक सेम लॅन्गवेज ??
अब्बस : भेन के लवडे .... तेरे मां कि ......
जॉन माझ्या कडे बघून :  वॉट डिड हि से ???
मी : जाऊन तुझ्या बापाला विचार भेंशोद .....
आपला,
(रॉ) विशुभाऊ

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

लिटिल इंडिया

सिंगापूर मध्ये 'लिटील इंडिया' नावाचे एक ठिकाण आहे ... इथे आल्यावर तामिळनाडू मध्ये असल्याचा भास होतो .... इडली , डोसा , रस्सम , पोंगल , केळीची पाने , पुजेची साहित्य विकणारी दुकाने , दक्षिण भारतीय पध्दतीची देवळं सगळे सगळे तंतो तंत.... हे झाले लिटील इंडियाच्या केंद्र भागाचे वर्णन.... त्याचा आजूबाजूला बरीच तमिळ इतर वस्ती आहे, त्यात इतर भारतातले लोकं, बांगलादेशी , पाकिस्तानी , श्रीलंकन राहतात व त्यांना इथे 'इंडिअन' असेच संबोधले जाते ... व ते सुद्धा स्वतःची ओळख 'इंडिअन' म्हणूनच करून देतात .....
आता एखाद्या मुसलमानाने सांगितले कि तो पंजाबचा आहे कि नक्की समजायचे हा पाकिस्तान चा आहे .... एखाद्या बंगाली बोलणाऱ्या मुसलमानाने सांगितले कि तो कोलकात्याचा आहे कि समजायचे हा बांगलादेश चा आहे .... पण सगळे इथे शहाण्या सारखे राहतात .... मुळात इथल्या कडक कायदा व्यवस्थेने सगळ्यांना 'चड्डीत' ठेवले आहे ...
माझ्या सारख्या अन्नार्थी माणसा साठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच !.... इथे भारतीय जेवणाची बरीच दुकाने आहेत .... सिंगापूर मध्ये मुसलीम संख्येने जास्त असल्याने त्यांनी मुसलमानांसाठी योग्य अशी खानावळ दर्शवण्यासाठी 'हलाल' सर्टीफिकेशन चालू केले आहे .... मुसलमानांसाठी जे खाणे 'हराम' आहे उदाहरणार्थ डुक्कर किंवा दारू वगैरे इथे विकले जात नाही ..... लिटील इंडिया मधल्या जवळ जवळ सगळ्याच खानावळी हलाल सर्टीफाईड आहेत .... ह्या खानावळी हिंदू ग्राहकांना आकर्षित करायला 'गोमांस' सुध्दा विकत नाहीत .... एकूण आपल्यासाठी बेस्ट जागा आहे हि जेवण्या साठी .....
इथेच पुढे 'मुस्तफा' नावाचे भले मोठे सुपरमार्केट आहे .... झेंडू बाम पासून एम.डी.एच. मसाल्या पर्यंत सगळे सगळे भारतीय प्रोडक्ट्स इथे मिळतात.... सिंगापूर मध्ये राहणारे भारतीय मोस्टली महिन्याचे सगळे सामान इथूनच भरतात ... पण इथे येण्या साठी शनिवार आणि रविवार हे दिवस मुख्यत्वे टाळा.... सगळा लेबर क्लास ह्या दोन दिवसात इथे मोकाट सुटलेला असतो .... संध्याकाळच्या विरार ट्रेनला जेवढी गर्दी नसते तेवढी इथे असते ....
लिटील इंडिया मध्ये आल्यावर सगळेच भारतीयच दिसतात त्यामुळे प्रवासी न्यूनगंड इथे आजीबात येत नाही .... तसेही म्हणा सिंगापुरात इतर ठिकाणी गेल्यावर सुध्दा तुम्ही परदेशी म्हणून तुमच्या कडे कोणी वळून वळून पाहत नाही व त्यात कोणी भारतीय समोरून आला तरी तो पाहून न पहिल्या सारखे करून निघून जातो ....
आपला,
(लिटील इंडिअन) विशुभाऊ

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

:: खंजीर ::

गैरोंकी चाहत मे मुहाजिर बन बैठे
आपनोंकी आखों मे अंगार बन बैठे ....

मजहब के नाम पे राह चले तो थे
आपनेही घर मे महेमान बन बैठे ....

इलहा की मर्जी पाने फितुर कर गए
तेरेही दरबार मे गुन्हेगार बन बैठे ....

अल-शुकर बनने की चाहत रखते थे
खुद ही खुदमै काफिर बन बैठे ....

ये गुमन आलम से 'अझाद' कर दे
हिन्दोस्तां मे देशद्रोही ना बन बैठे ....

__________________________________

मुहाजिर (भरतीय मुसल्मानोंको पाकिस्तान मे ये नाम से ठुकराया जाता है), इलहा (परमेश्वर,अल्ला), फितुर (दोष, गलती), अल-शुकर (जो काफिर नहि है), काफिर (नास्तीक), गुमन (भ्रम), आलम (विश्व). . .

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

::दारूळी:: नसतेस घरी तू जेव्हा ... ( संदिप खरे ची माफी मागुन)

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ... घुटका पितो
मैफिलीचे जुळती धागे
मित्रांना घरी बोलावतो .....

आकाशातून अप्सरा उतरावी
माहोल तसा होतो
बियर दिशाहीन होते
अन प्याला रिक्त होतो ....

येतात बाजूचे दाराशी
शिव्या देऊन जाती मागे
खिडकीशी सिगारेट पितो
धूरही तालात जातो ....

हो झालो अजुनी मोकळा
'अझाद' अजुनी झालो
तुज वाचून उमजत जाते
संसारात उगाच अडकतो ....

नसतेस घरी तू जेव्हा
जीन घुटका ...

आपला ,
(अझाद) विशुभाऊ
ह्या विडंबनाचा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा काही एक संबंध नाही .... तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा ....
आपला,
(सत्यवचनी) विशुभाऊ 

आल इज वेल

भारतीय लोकं म्हणजे पराकोटीचे आशावादी .... कितीही मोठा प्रसंग आला तरी पुढे निट होइल आणि आपण सुखरूप आहोत असे समजुन चालणारे ..... हीच गोष्ट 'थ्री ईडियेट' मध्ये आमिर खान ने 'आल इज वेल' ह्या रूपत दाखवली आहे .... त्या दिवशी इथे युनिवर्सल स्टूडियो मध्ये पण 'आल इज वेल' आणि भारतीय मनोवृत्तिची जाम खेचली .......
पण माला आजिबात राग आला नाही.... कारण आपण असेच करतो ....
आपल्याच देशात आपली गळचेपी झाली तरी .... 'आल इज वेल'....
कल्माडीने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
राजाने घोटाळा केला तरी .... 'आल इज वेल'....
कसाबने हल्ला केला तरी .... 'आल इज वेल'....
पंताप्रधानाने पैसे खाल्ले तरी .... 'आल इज वेल'....
मुसल्मानानी हैदोस घातला तरी .... 'आल इज वेल'....
.... 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'........ 'आल इज वेल'....
आपला,
(आल इज वेल) विशुभाऊ ....

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

आजी आणि नातवंड

जगातल्या प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळेच समीकरण असते , त्यातल्या त्यात जर ते आजी आणि नातवंडांचे असेल तर 'नातवंडांची काळजी आणि त्यांच्या आईला टोमणे'!!! .....
माझ्या आजीला म्हणजे बाबांच्या आईला मुळात १० मुलं असल्याने नातवंडाची काही कमी नव्हती .... तरी मी म्हणजे मुलाचा मुलगा किंवा वंशाचा दिवा किंवा माझ्या १४ बहिणींच्या भाषेत 'दिवट्या' म्हणजे एक मोठे प्रस्थ होते .... संपूर्ण घराण्यात लाडावलेला एक आळशी आणि खादाड पोरगा म्हणजे 'मी' .... असे असून सुद्धा माझी आजी मला पाहिल्यावर , आईला बोलायची 'बिचाऱ्याची गालफट्ं बसली आहेत' ,'बरगड्या निघाल्या आहेत' , 'पोराला काही खायला देतेस कि नाही ??'  वगैरे वगैरे ..... आणि ह्याने जास्तच लाडात येऊन मी केविलवाणा चेहरा करायचो आणि आई स्वस्थ पण वेगळाच भाव.......
त्या दिवशी माझ्या मुलीला पाहून आई बोलली 'किती बारीक झाली आहे !!" .... लगेच आमच्या कन्येने केविलवाणा चेहरा केला आणि बायकोच्या चेहऱ्यावर आईचा पूर्वीचा भाव दिसला.... आणि मी गालातल्या गालात हासलो ....
आपला,
(दिवट्या) विशुभाऊ