Monday, January 4, 2010

नवी पिढी

"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....

लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...

पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....

दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!

आपला,

(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....

Thursday, December 31, 2009

टॅगी टॅगी....

कांचन ताईने टॅगले... नंतर विरू मग सिध्दार्थ, सगळेच टॅगी टॅगी खेळायला लागले... मला कळायला थोडा वेळ लागला ... पण शेवटी मी पण टॅगी....


1. Where is your cell phone?
कानाला आहे.

2. Your hairs?
माझे पांढरे झालेले केस मला गर्वाने फुलवतात आणि बायकोला चार-चौघात लाजवतात.

3. Your Mother?
प्रेमळ

4.Your Father?
शांत

5. Your favorite food?
मी शुध्द मांसाहारी आहे.

6. Your dream last night?
माझी Phd पुर्ण झाली.

7. Your favorite drink?
व्हिस्की ने लुटा मुझे , रम में क्या दम था ????? आपनी नय्या वहा डूबी जहा बियर का ड्रम था !!!!!!!!

8. Your Dream/Goal
सर्व विश्वात एकसंग operating system स्थापित करणे ( ह्याला मराठीत Universal Operating System म्हणतात.)

9. What room you are in?
अभ्यासाच्या खोलीत

10. Your hobby?
थोडे थोडके छंद असतील तर ना..... मुळात छंदिष्टच आहे मी ;-)

11. Your fear?
मर्द को डर नही लगता... हां कभी कभी घाबरताय !!!!!

12. Where do you want to be in next 6 years?
पुढील ६ वर्षांचे माहीत नाही... पण येत्या ६ महिन्यात इस्राईल, जॉर्डन व इजिप्त ला बायकोबरोबर जाण्याचा बेत आहे (व्हिजा मिळाला तर! आणि हो पैसे पण..).

13. Where were you last night?
गोड स्वपनात

14. Something you aren't diplomatic?
जे काही आहे ते तोंडावरती... नाही तर फाट्या वर.... डिप्लोमॅटीक होणे माझा स्वभाधर्म नाही.

15. Muffins?
कालखंडा बाहेरील प्रश्न.

16. Wish list item?
बिचारा देव थकला माझी लिस्ट बनवून......

17. Where did you grow up?
आईच्या पंखांखालीस व बाबांच्या कडेवर

18. Last interesting thing you did?
लग्न !!! त्या नंतर interesting  गोष्टींचा शेवट.... ;-)

19. What are you wearing?
वल्कले नेसणाऱ्यातला मी नाही.....

20. Your TV?
कार्टून नेटवर्क....

21. Your pets?
नाही.

22. Friends?
माझी बायको माझी सगळ्यात जवळची मैत्रीण.... किंबहूना आधी मत्रीणच होती....

23. Your life?
इनकंप्लीट विदाउट वाईफ.

24. Your mood?
झकास.

25. Missing someone?
हो..............

26. Vehicle?
मारुती अल्टो

27. Something you aren't wearing?
साडी...

28. Your favorite store?
कोणतेही पुस्तकालय...

29. Your favorite color?
लाल..

30. When was the last time you laughed?
काही मिनीटां पुर्वी.

31. Last time you cried?
’दमलेल्या बाबाची कहाणी...’ हे गाणे ऎकल्यावर.

32. Your best friend?
माझी सगळ्यात जवळ्ची मैत्रीण म्हणजे माझी बायको व सगळ्यात जवळचा मित्र प्रसाद

33. One place you go to over and over?
पुणे आणि कोल्हापूर

34. One person who mails me regularly?
कमीत कमी १०० जण आहेत... आजकाल मलाच वेळ नाही मिळत...

35. Favorite place to eat?
आईच्या हातचे जेवायला कोणतीही जागा चालते....

आता मी सौरभ , आनंद, हर्षल, मनमौजी, महेंद्र ,  ना आणि सर्व वाचकाना टॅगतो....

आपला,
(टॅगोरी) विशुभाऊ



Sunday, December 20, 2009

महाराष्ट्राचे द्विभाजन - त्रिभाजन.....



तेलंगणा नंतर पुन्हा स्वतंत्र-विदर्भ हा मुद्दा ऎरणीवर आला. वितरीत प्रशासना मुळे नक्की कसा फायदा कोणा एका प्रदेशाला होणार किंवा तोटा होणार ह्याचा ठोकटाळा लावणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलिकडचे असल्या मुळे मी ह्या विषयावर चार-चौघात आपले तारे तोडत नाही; पण काही दिवसांपुर्वी बाबासाहेबांचा ’महाराष्ट्राचे त्रिभाजन’ हा प्रबंध वाचला .... त्या वर हा लेख.

बाबासाहेबांच्या प्रबंधनातला प्रमुख मुद्दा हा मराठी लोकांच्या प्रगती साठी जस्तीत जास्त नेते देणे हा होता.... म्हणजे समजा महराष्ट्राचे तीन भाग केले तर एकुण तीन मराठी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री मराठी जनतेला मिळतील. खरे सांगायचे तर ह्याने काय साध्य होणार हे मला अजिबात कळले नाही, एक मुख्यमंत्री समजा ५ वर्षात ३०० कोटी कमवतो तर तिन मुख्यमंत्री १००-१०० कोटी कमवतील. आता ह्यात फक्त दोघांचा फायदा होऊन तिसऱ्याला २०० कोटींचे नुकसान दिसते, व बाकी सामान्य जनता जैसेथे !! ............

’नाशिक च्या मराठी माणसाला कोकणी माणसा बद्दल काय अपुलकी?’ हा बाबासाहेबांचा मुद्दा मला मनोमन पटला पण म्हणून काय वेगळे राज्य करायचे???? , अता मराठी माणसाला बिहारी बद्दल अपुलकी नसते म्हणून वेगळे राष्ट्र करायचे का???... कदाचीत मी रणदिवे असल्याने थोडाफार ’कम्युनीस्ट’ आहेच व मला हे कधीच पटणार नाही.....

त्यादिवशी कोणितरी सांगत होता की विदर्भातले शेतकरी आत्महात्या करतात त्याला सरकारचा विदर्भा च्या बाबतितला निष्काळजीपणाच कारणीभुत आहे... अरे तू जे आमदार-खासदार निवडून दिलेस ते काय .....???? की ते फक्त स्वतंत्र ( आताही विदर्भ पारतंत्रात नाही) विदर्भा नंतरच काम करणार????

कोणतेही मुद्दे हे खंडी करणाने सुटणार नसून , केवळ आपापसातले राजकारण, व हेवेदावे वाढवणार आहे. मला माझ्या विवीधतेने नटलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान आहे व तो संयुक्त ठेवण्यासाठी मी माझ्या शरिरातल्या शेवट्च्या रक्तथेंबा पर्यंत लढा देईन.....

आपला,
(संयुक्त-मराठी) विशुभाऊ.

Friday, November 27, 2009

कसाब ला मृत्यूदंड कसा द्यावा ?


दोस्तांनो,

आज २६/११ च्या पार्श्वभुमीवर मी, बाळासाहेबांनी आणि तात्यासाहेबांनी बऱ्याच वेळ कसाब ला फाशी सारखे सुखासुखी मरण न देता कशा प्रकारे तडपवून तडपवून मारावे ह्या वर मंथन केले... कोणतीही मनाला शांती देणारी पध्दत मिळाली नाही....
कृपया आपणास कोणतीही पध्दत सुचवायची असल्यास कळवावे...

आपला,
(पछाडलेला) विशुभाऊ

Wednesday, November 11, 2009

म.न.से. ला दिलेला पाठिंबा

आमच्या तिर्थरुपांनी म.टा. वर म.न.से. ला दिलेला पाठिंबा वाचा
आपला,
(मराठी) विशुभाऊ





Thursday, November 5, 2009

देश आणि धर्मं

काही कट्टर  मुसलिम संघटणांनी घातलेला  ' वन्दे मातरम' चा वाद वाचला आणि डोके फिरले .... भोसडिच्यानो देशा आधी तुमचा धर्मं येणार असेल तर तुम्हाला देशद्रोही बोलले पाहिजे .... जा न मग इथून जिथे वन्दे मातरम बोलावे नाही लागणार तिथे .... ज्याच्या मानत देशा आधी धर्म येतो तो देशाद्रोहिच आहे मग तो मुसलिम असो की हिन्दू ....
आपला,
(देशाभिमानी) विशुभाऊ

Sunday, October 25, 2009

भुताडकी - भाग १

आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले, तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन'नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले.

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी '७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे. सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत!.. अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे, व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता... पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची, म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता.... लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते... वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले...........

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे; नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे.... त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो, तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला. एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली.... व बाबांनी ती हसण्यावारी नेली.... थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली, व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला " अहो, कोणाशी बोलता आहत ?" बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला.......

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे!... ते पण शहारले.... त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ.............. आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे, कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे........ घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे, आवाज येणे, सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते .....

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती.... दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?, त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली... तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती... आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले... !

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला , आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली.... ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो... त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले , म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले... त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते.... ते तिच्या शी तावातावाने भांडत होते... तिच्यावर ऒरडत होते.. तिला शिव्या देत होते... ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली... त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला... ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते... म्हातारीला भिती दाखवत होते... ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले .... त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो... ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ

Friday, October 16, 2009

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


नमस्कार,

तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.

आपला,
(शुभचिंतक) विशुभाऊ

Saturday, October 10, 2009

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

Sunday, October 4, 2009

निवड्णूक !

    ह्या निवडणूका आल्याकी मला जरा धडकीच भरते, जस जशी निवडणूकेची तारिख जवळ येते तस तशी हि ५ वर्ष बॅनरवर दिसणारी साहेब, नाना, तात्या, बंटी, भाऊ, कार्यसम्राट, ह्र्दयसम्राट वगैरे मंडळी आमच्या घरची धूळ झाडायला येतात. कोण जाणे कसे पण येताच नावाने हाक मारून आदबिने नमस्कार सुध्दा करतात, व मी नियमीत पणे त्यालाच कसे मत देत आलो आणि येणार हा प्रत्येकाला विश्वास देतो.....

    दर निवडणूकीला घरी आलेल्या उमेदवाराला मत देण्याच्या आश्वासनांची टेप माझी चोख पाठ असते, व त्यात (टेप वाजवण्यात) मी कधीच चुकत नाही. पण गेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या वेळी मोठा गोंधळ झाला, त्याचे झाले असे की आमच्या मतदार संघातल्या धडाडिच्या आणि तरूण कर्यकर्त्या सुंदराबाई ( sorry ताई) भरदुपारी आमच्या घरी आपल्या पाळलेल्या इमानदार लोकांना घेऊन आल्या. मी नुकताच ऊठलो होतो आणि घरात कोणिही नसल्याने स्वतःच चहा बनवण्याची तयारी करत होतो. ’आल्या अथित्या मुठ्भर द्याया मागे पुढती पाहू नको!’ ह्या आनंद फंदिंच्या फटक्याला जागुन त्यांना चहा विचारला व ते सगळे जण एक सुरात ’हो’ बोलले.... आता झाली ना पंचाईत ! दुध फक्त २ कप चहाचे आणि हे बाई व इमानदार पकडुन १५ जण... त्यातल्या त्यात एक गरिब इमानदार पकडला व त्याला पैसे देऊन बिल्डींग खालच्या भट कडून १६ कप चहा मागवला.... आता ह्या बाईंनी ताबा घेतला व आपण केलेल्या कामाची उजळणी चालू केली, माझ्या घराचा हॉल म्हणजे व्यासपिठ झाले होते... ही बाई आणि माझ्या पोटातले कावळे एकजात एकसुरात ओरडत होते... तितक्यात तो गरिब इमानदार आला व माझी त्या भाषणातून सुटका झाली... मी त्या बाईंना विश्वास दिला की हे मत तुम्हालाच मिळणार , तसेही आपले संबंध (वैयक्तिक) खुप जुने आहेत... त्यावर बाई खुश होऊन निघुन गेल्या...

    सुंदराबाई जातात न जातात तोच त्यांचे खंदे विरोधक अण्णासाहेब दरवाज्यात उभे !..... आता हे अण्णासाहेब म्हणजे तेव्हा होणाऱ्या आणि आताच्या झालेल्या सासरचे , मान ठेऊन त्यांना पण आत बोलवले व त्यांनी लाजेखातर का होईनात पण चहा नाही सांगितला.... परत तेच बोलणे चालू झाले... ह्यांनी गटार साफ केली तर त्यांनी कचरा कुंड्या लावल्या... ह्यांनी स्मशानाची जागा वाढवली तर त्यांनी विद्युतदहनीका लावली... मी ह्यांना पण मत देण्याचे आश्वासन देतच होतो की सुंदराबाई त्यांचा राहिलेला मोबाईल घ्यायला आल्या!!!.... खप्प... माझी बोलतीच बंद झाली...

बाई गरजल्या : ’अण्णासाहेब, विशुभाऊ फितणार नाहीत ! आमचे संबंध जुने आहेत !’
अण्णासाहेब:  संबंध ?? बाई आमच्या होणाऱ्या जावयावर नसते आरोप सहन नाहि करणार!! याद राखा !!!
सुंदराबाई : काय हो ...... मतदान करणे हा काय नसता आरोप आहे का??? काल रात्री कुठे होतात हे मला बरोबर माहित आहे ....
अण्णासाहेब: @#%^$&$$%&%*
सुंदराबाई: *^^*(%$#%

मी डोक्याला हात लावला.... त्यांना दोघांना शांत करत मी सांगितले " तुम्ही दोघांनी सुध्दा समाजासाठी खुप काम केले आहे !, पण दुर्देवाने मी उद्याच २ महिन्या साठी परदेशी जात आहे, तेव्हा कृपाकरुन भांडण थांबवा, व कोणीही निवडून आले तरी मला आनंदच आहे!" त्यावर दोघेजण मला शिव्याशाप देत निघुन गेले, व माझी सुटका झाली.....

आपला,
(मतदाता) विशुभाऊ

Friday, October 2, 2009

गांधी आणि मी !


हा लेख चालू करण्या आधीच मी स्पष्ट करतो की मी पुर्णतः जहालवादी आहे, कोणी कानाखाली वाजवणे सोडाच, आडवा पण आला तरी हात-पाय तोडून त्याच्या बायका पोरांना धंद्याला लावणारा मी.... तरी गांधीजींना शिव्या देणाऱ्यातला मी नाही !!!!

गांधी हे खरच महत्मा होते, मी नक्की कबूल करतो की देशाची ही स्थिती होण्या पासून ते वाचवू शकले असते, देशाची फाळणी वाचवू शकले असते...किंवा सर्व मुसलमानांना पाकिस्तानात हकलवू शकले असते. गांधीजी ना ह्या देशाच्या संस्कारावर भरपूर विश्वास ! त्यांना वाटले की सगळे मुसलमान वाईट नाहीत, आपल्याच हाडामासाचे.... पण त्यांना हे कसे कळले नाही की मुसलमान देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत ते लढले ते खलीफ़ा साठी!!

तरी गाधींचे काही गुण आहेत ते आपण मानलेच पाहिजेत :

१) बोलणे तसे रहाणे, तसे वागणे.
२) देशासाठी ( भले त्यांना तसे वाटत होते) अखुड कपड्यांमध्ये संपुर्ण जिवन काढणे.... (थोर विचार)
३) कितीही झाले तरी डोके शांत ठेवणे... ( हे माझ्या सारख्या जहालवाद्यांना साता जन्मात शक्य नाही)
४) लोकांना संघटीत करणे !!! व देशप्रेम जागवणे....

आज जेव्हा मी इतस्थः बघतो तेव्हा मला असा नेता कुठेच दिसत नाही.... असो पण आज गांधी जयंती साजरी करायची , अजून काही करूपण शकत नाही... ड्राय डे आहे !!!

आपला,
(ड्राय-डे त्रस्त) विशुभाऊ

Thursday, October 1, 2009

तात्यासाहेब अडारकर

जैविकशास्त्राच्या पुस्तकातील माणसाच्या आकृती सारखी शरिरयष्टी, डोक्यावर टक्क्ल आणि हसरा चेहरा असे अमचे तात्यासहेब. वास्तविक पहाता तात्यासाहेब म्हणजे माझे office मधले boss, पण वागण्याने एका मित्रा पेक्षाही जास्त. कोणिही यावे आपली अडचण सांगावी व मदत घेऊन जावी असा परोपकारी माणूस... खरच ३०० वर्षातून एकदा असा माणूस जन्माला येतो, कदाचीत तुकाराम महाराजां नंतर तात्यासाहेब अडारकरच !

मासे आणि मास्याचे डोके खाऊन खाऊन झालेली तल्लख बुद्दी, अत्यंत महिनती स्वभाव आणि पराकोटीचे बियर-प्रेम.... हा माणूस खरेतर एका मराठी प्रतिभावंत कूटूंबात जन्मला... आपली प्रतिभा त्याने मदिराप्रेमी साहित्य लिहीण्यात मार्गी लावली. बियर पिण्याची मजा तात्यासाहीबांबरोबर जी आहे ती खुद्द मल्ल्याबरोबर फुकट्ची पिण्यात सुध्दा नाही..... तात्यासाहेब जेव्हा टेबलवर बसतात तेव्हा बियर पण आनंदाने फेसाळते, सोनेरी रंग आजून उजळतो आणि स्वाद अहा! इंद्राचा अमृतप्याला पण झक मारतो..... तात्यांचे नेहमीचे एक वाक्य आहे’जगात बियर हिच एक अशी गोष्ट आहे की ती पहिल्या घोटापासून शेवट्च्या घोटापऱ्यंत तशीच आणि सुंदर लागते!’ म्हणूनच तात्यांबरोबरची बियर कधीच संपू नये असे वाटते....

"तात्या माझा घरचा computer बंद पडला!" , " तात्या थोडे पैसे पाहिजे आहेत!" , "तात्या Data-center down आहे, client पेटला आहे!", "सर, मला उद्या बयको बरोबर जायचे आहे, माझे office चे काम तुम्ही कराल का?" ...... वगैरे कोणते ही प्रश्न असोत, तात्या सगळ्याला तयार.... ’नाही’ हा शब्दच मी कधी ऎकला नाही त्यांच्या कडून... त्या माणसाच्या दृष्टीत कोणीच वाईट नाही, सगळे चांगलेच आणि सगळ्यांना मदत करणे ह्यांचे आद्यकर्तव्य!

मागील महिन्यात माझे job profile बदलल्याने तात्यांना सोडून मला जावे लागले... उगाच डोळे पाणावले.... खरच अशा व्यक्तीच्या सान्निध्यात येण्यासाठी साता जन्माची पुण्यायी लागते !!!

आपला,
(हळवा) विशुभाऊ

Monday, September 28, 2009

विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी क्षणांचा सोबती विशुभाऊ रणदिवे कडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या सुवर्ण शुभेच्छा !!!!

आपला,
(सोनेरी) विशुभाऊ

रिक्षावाला

रिक्षावाला ह्या प्राण्याबद्दल मला अगदी लहानपणा-पासून चे कुतूहल. रिक्षावाला होणे हे सोप्पे अजीबात नाही!, त्यासाठी तुम्हाला गिऱ्हाईकाशी तुसड्या पणे बोलता येणे गरजेचे आहे, त्यात तूम्ही पुणेरी रिक्षावाले होऊ ईच्छीत असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा लांबचा मार्ग माहीत हवा......

ह्या सर्व रिक्षावाल्यांमध्ये माझा संशोधनाचा रिक्षा व्यवसाय म्हणजे ’शेअर-रिक्षा’.... ठाण्या मध्ये ह्यांना ’शेअर ऑटोस’, नाशकात ’शेर रिक्शा’, पूण्यात ’टमटम’ तर कोल्हापूरात ’वडाप’ आणि बडोद्यात ’छकडा’ असे बोलतात !.

आता नाशिकचा रिक्षावाला म्हणजे एकदम राजेशाही व्यक्तीमहत्व ! गिऱ्हाईकाला आपली गरज असुन आपल्याला काडी मात्र गरज नसल्याचा त्याचा ठाम विश्वास असतो, पण पुणेरी रिक्षावाल्या पेक्षा ह्याची भुरटेगिरी जरा वेगळी असते... तो कुठेही तुम्हाला गोल गोल फिरवत न बसता सरळ-सोट रस्त्याने घेऊन जतो व वाट्टेल तो भाव सांगतो. एकदा मी महामार्ग ते PTC (पोलीस ट्रेनींग कॅंप) पर्यंत गेलो असता त्याने मझ्याकडून चक्क १२० रुपये घेतले... वास्तविक पहाता मी ठाण्यामध्ये ह्या अंतरा साठी जस्तीत जास्त ३० ते ३५ रुपये दिले असते...

बडोद्याचा रिक्षावाल्यावर चित्रपट काढता येईल इतका मोठा विषय आहे हा... ईथले रिक्षावाले पायाने सिग्नल देतात ..... काय बोलणार ???

कोल्हापूर हे माझे आवडते शहर म्हणून नाही पण कोल्हापूर चा रिक्षावाला हा खरच ईतरांच्या मानाने सज्जन !! ’चलाकी हे ईथे ढ्यांग भर अंतरावर’म्हणून लगेच आदबिने पण आपल्या तोऱ्यात नेणार .... कोल्हापूर ची वडाप ही तुम्हाला एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत अगदी ५ रुपयात सोडते... आणि मजेची गोष्ट ही की ठाण्यात माझ्या सारखे ३ लोक रिक्षात बसले की दाटिवाटी होते, पण कोल्हापुरात माझ्यासारखे ४ लोक मागे व ३ लोक पुढे बसून प्रवास करतात.... खरच ’नाद नाही करायचा !’

आपला,

(नादखूळा) विशुभाऊ

Friday, September 25, 2009

सर्कस

आज म.टा. वर "द ग्रेट महाराष्ट्र विधानसभा सर्कस!" हा लेख वाचताना खुप खळखळून हसायला आले.... खरच ही राजकारणी लोक पिंजऱ्यात कोंडलेल्या डुकरा सारखी वागतात !!!!

आपला,
(रिंगमास्टर) विशुभाऊ

Monday, September 21, 2009

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व ईसलाम पंथीयांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !

आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ,

( भारतात राष्ट्र हाच धर्म आहे बाकी सर्व पंथ! परत ह्या वरून आमच्याशी वाद घालू नका !)

आपला,
(राष्ट्रप्रेमी) विशुभाऊ

Saturday, September 19, 2009

मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !

पर्वा झालेल्या ’बा’चा-’बा’ची नंतर, मराठी राजाने ठरवले जाऊदे करुन टाकू फोन मास्टरांना.....

राजा: नमस्कार मास्टर,
मास्टर: बोल बेटा, कशी काय आठवण काढलीस आज?
राजा: मास्टर, किती दिवस जुने घेउन बसणार आहत? वाघोबा म्हातारे झालेत हो ! या ईथे
मास्टर: असे नसते रे बेटा, आम्ही जुने शिकारी आहोत, पोरगा मनी-माऊ असला तरी छावाच म्हणायचा....
राजा: छावा नाय तो !!! सगळा निवडूंगाचा फड झाला आहे, आणि मास्टर शहाण्या माणसाने निवडूंगाच्या फडात पाय टाकू नये !
मास्टर: नाही रे बाळा, जाऊ दे !! तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी.... नंतर चे नंतर बघू !!!

राजा आणि मास्टर: जय महाराष्ट्र!!!!


आपला,
(कवडा) विशुभाऊ,

नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

सर्व वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शु्भेच्छा !!!

आपला,
(शुभेच्छूक) विशुभाऊ

Friday, September 18, 2009

चकोर चकोर तर मी चतकोर !!

लोक म्हणतात की आम्ही चकोर style लिहीतो .... आहो चकोर आम्हाला गुरूवर्य आहेत , हे नक्की की आमचे लिखाण हे त्यांच्या लिखाणाने प्रभावित असते... पण आम्हाला त्यांच्या नखाची पण सर नाही!!

म्हणूनच " चकोर चकोर तर मी अगदि चतकोर !!!!"

आपला,
(चतकोरी) विशुभाऊ

Tuesday, September 15, 2009

राजा आणि भैया !

सकाळी भैया जाम कंटाळलेला होता, काय करावे समजत नव्हते. एक महिन्यावर निवडणूका आल्या तरी सगळी कडे कसे शांत शांत होते, मराठी राजा पण बरेच दिवसात आळसावलेला आहे. लगेच भैयाला युक्ती सुचली, त्याने राजाला फोन लावला....

भैया : जय राम जी की राजा साहाब.
राजा : बोल रे भामट्या!, सकाळ सकाळी काय आठवण काढलीस ?
भैया : क्या राजा साहाब, एक महिना पे चुनाव है , और आप एकदम शांत हो ? कहि ऐसा तो नही की आप वापिस जाने वाले हो ?
राजा : अबे च्युते, तू तो कुच करता नही,आणि माझ्यावर आरोप करतोस, भडव्या राहिच आहे ना ईथे?
भैया : राजा साहाब, आपतो घुस्सा हो गये.... रुको कुच तो करता हूं... ताकी आपको माराठी लोगोंकेलीये काम करने का बहाना मिलजायेगा !
राजा : ठिक है... ह्याने मला परत वाघांची मते खाता येतील !!!
भैया : और इससे तो आपने 'हात और घडी' का ही तो फायदा है !!!!
राजा : हा हा हा !!!!

थोड्या वेळाने राजा TV लावतो , आणि बघतो तर काय?

भैयाने विधानसभे साठी ७० % जागा मागितल्या !!!! हा हा हा राजा खुष हुआ !!!

आपला,

(चाप्टर) विशुभाऊ