हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प: विवाद आणि अडचणी

मी माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये जैतापूर च्या आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्याचा निषेध केला असला तरी प्रकल्पाच्या विरोधातच माझी मते आहेत. आता प्रकल्पाला विरोध का हे बऱ्याच जणांना माहित नाही आणि कित्येक ह्या लढ्यात उतरणाऱ्या राजकारण्यांना सुध्दा ते माहित नाही; म्हणून मी इथे विवादाची करणे थोडक्यात सांगत आहे... नक्की विचार करा :
१) कुठला ही आण्विक अपघात झाल्यास , दोषी विरुद्ध कायद्याने न्यायालयात जाण्याची परवानगी फक्त NPCL ला आहे अपघात ग्रस्त्याला नाही, असा अनुच्छेद Nuclear Damage Bill २०१० मध्ये आहे.
२) ह्या प्रकल्पा मुळे होणारा वातावरणा वरचा परिणाम ह्या बद्दल आण्विक-विरुद्ध संघटना अजून साशंक आहेत.
३) जैतापूर हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील नसले तरी संवेदनशील आहे ( संवेदानाशिलातेच्या दृष्टीने झोन ३ मध्ये आहे )
४) जैतापूर येथील परमाणु कचऱ्याची विलेवाट ह्या विषयावर आजूनही स्पष्टीकरण आलेले नाही किंवा तोडगा सुचवला गेलेला नाही.
५) प्रकल्पा मध्ये समुद्राचे पाणी शीतलक म्हणून वापरून ते पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तिथल्या मास्यांवर आणि मासेमारी धंद्यावर पडणाऱ्या परिणामाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

आपला,
(विचारी) विशुभाऊ

जैतापूर आणि गोळीबार

जैतापूर मध्ये झालेल्या प्रकरणाचा काल मी खुप विचार केला , त्याच्या बर्याच चित्रफिती पहिल्या..... खरे तर जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातच माझी भूमिका होती आणि आहे, तरी कालचा प्रकार जो आंदोलकांनी केला त्याचा मी नक्कीच निषेध करेन. आंदोलनाचा आणि पोलीस स्टेशन जाळण्याचा काय संबंध???
मला तर असे वाटते की काल जे जाळपोळ करायला गेले त्यांचा आणि आंदोलनाचा काहीच संबंध नाही, त्यांना पोलीस स्टेशन जाळून रेकॉर्ड्स नष्ट करायचे होते आणि त्यात जर पोलिसांनी गोळीबार केला तर काय चुकले ???
मित्रानो कोणत्याही चांगल्या आंदोलनाला साहाय्य करणे चांगलेच पण त्याचा फायदा घेऊन वाईट किंवा स्वार्थी कृत्य करणे हे तितकेच निन्दनीय आहे. जर आज आपण गोळीबारात मारल्या गेलेल्याला श्रद्धांजली देण्याचा विचार करत असाल , तर एकदा नक्कीच सारासार विचार करा.
आपला,
(आंदोलक) विशुभाऊ

सोमवार, १८ एप्रिल, २०११

मराठी ब्लॉगर्स मेळावा २०११


माझ्या ब्लॉगर्स मित्र मैत्रीणींनो ,

ह्या वर्षी चा मराठी ब्लॉगर्स मेळावा दादर , मुंबई येथे सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत करण्याचे योजलेले आहे. मेळाव्याची वेळ , स्थळ ह्याच बरोबर रुपरेषा ह्या सर्वांचा विचार करता फक्त ७५ सदस्यांनाच येथे नोंदणी करण्याचे बंधन नाईलाजाने घालावे लागले आहे त्या बद्दल क्षमस्व !
नोंदणी साठी http://marathibloggersmeet.blogspot.com/2011/04/mbm-mumbai-2011-registration.html येथे टिचकी मारावी

आपले,
(आयोजक)
विशुभाऊ रणदिवे
कांचन करई
महेंद्र कुलकर्णी
सुहास झेले