हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प: विवाद आणि अडचणी

मी माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये जैतापूर च्या आंदोलकांनी घेतलेल्या पावित्र्याचा निषेध केला असला तरी प्रकल्पाच्या विरोधातच माझी मते आहेत. आता प्रकल्पाला विरोध का हे बऱ्याच जणांना माहित नाही आणि कित्येक ह्या लढ्यात उतरणाऱ्या राजकारण्यांना सुध्दा ते माहित नाही; म्हणून मी इथे विवादाची करणे थोडक्यात सांगत आहे... नक्की विचार करा :
१) कुठला ही आण्विक अपघात झाल्यास , दोषी विरुद्ध कायद्याने न्यायालयात जाण्याची परवानगी फक्त NPCL ला आहे अपघात ग्रस्त्याला नाही, असा अनुच्छेद Nuclear Damage Bill २०१० मध्ये आहे.
२) ह्या प्रकल्पा मुळे होणारा वातावरणा वरचा परिणाम ह्या बद्दल आण्विक-विरुद्ध संघटना अजून साशंक आहेत.
३) जैतापूर हे भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील नसले तरी संवेदनशील आहे ( संवेदानाशिलातेच्या दृष्टीने झोन ३ मध्ये आहे )
४) जैतापूर येथील परमाणु कचऱ्याची विलेवाट ह्या विषयावर आजूनही स्पष्टीकरण आलेले नाही किंवा तोडगा सुचवला गेलेला नाही.
५) प्रकल्पा मध्ये समुद्राचे पाणी शीतलक म्हणून वापरून ते पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तिथल्या मास्यांवर आणि मासेमारी धंद्यावर पडणाऱ्या परिणामाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

आपला,
(विचारी) विशुभाऊ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा