हा फळा फक्त हसवण्या साठी आणि प्रबोधना साठी आहे , वैयक्तिक हेवेदावे करण्या साठी नाही , याची कृपया वाचकाने नोंद घ्यावी ! आपला , (नम्र) विशुभाऊ

शुक्रवार, ४ मार्च, २०११

मै शायर तो नही. . . .

ज्या प्रमाणे जे फक्त स्वतः साठी गातात त्यांना 'बाथरूम सिंगर' म्हणतात , त्याच प्रमाणे स्वतः साठी कविता लिहिणाऱ्यां साठी पण एखादा शब्द पाहिजे. मी स्वतः साठी कविता करतो (खरं तर यमक जुळवतो). तरी शायरी आणि गझल हे माझे खास आवडीचे विषय.
इयत्ता चौथीत असताना मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि मार्झा गालिब माझे सोबती झाले. मला उर्दू तर येत नव्हती पण आर्थ समजून उगाच त्याचे मराठीत भाषांतर/भावांतर करत 'तिला' ऐकवत आलो. गेल्या काही दिवसान पासून मी उर्दू जरा मनावर घेऊन अभ्यास चालू केला, व एक गझल सर्दुष्य काव्य केलं ( ह्यात रदीफ आहे पण काफिया जुळला नाही) , पहिलाच प्रयत्न म्हणून मातला आणि मकता मध्ये संपवले.

काफिया है पर रदिफ नही , मतला है पर मकता नही ।
अरे कमिनो ये मेरी जिंदगी है , कोई गज़ल नही ।

नही रोक सकती तुझे कोई सऱहदे , ना कोई इनसान की सलाखे ।
'आझाद' तेरी खुदा से बंदगी है, कोई काफिरोंका बंदी नही ।

इथे काफिर म्हणजे 'माणुसकी नसणारा' ह्या अर्थाने आहे , व 'आझाद' हे माझे तखल्लुस .....

आपला,
(आझाद) विशुभाऊ

रविवार, ९ जानेवारी, २०११

पूर्व दिशा

भारत वर्षाला हजारो हजारो वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षान पासून इथे धार्मिक कार्य, वास्तुशास्त्र हे दिशा प्रमाण मानून होतात, आणि ह्याच गोष्टीनी मला लहान पणा पासून संभ्रमात टाकणारा प्रश्न निर्माण केला ' आधी लोहचुंबक कि आधी दिशा? '.....


ह्या विषयाचा शोध घेताना बरीच पुस्तकं वाचली बर्याच विद्वानांचे निष्कर्ष वाचले आणि एकदा लहानपणी डॉ. प. वि. वर्तक यांचे 'वास्तव रामायण' वाचण्यात आले आणि शोधाला दिशा मिळाली. गेल्या आठवड्यात माझे त्यावेळी केलेले संशोधन आणि हस्तलिखिते मिळाले आणि पुन्हा त्या विषयाला उजाळा आला; तर चला बघूया आपले पूर्वज दिशा कसे ओळखत असत ......

रामायणात प्रत्येक दिशेचे सुंदर वर्णन सुग्रीव ह्याने आपल्या वानर सेनेला सिताशोधार्थ पाठवताना केले आहे. किष्किंधा सर्ग ४० मध्ये सुग्रीव खालील प्रमाणे पूर्व दिशेचे वर्णन वानर सेनेचा सेनापती विनात याला करतो:


त्रिशिराः कांचनः केतुः तालः तस्य महात्मनः ।
स्थापितः पर्वतस्य अग्रे विराजति स वेदिकः ॥४-४०-५३॥


अर्थ: तीन शिरा असलेल्या सोनेरी तालवृक्षाकृती त्याचे महत्म असून, ते पर्वताच्या अग्रभागावर स्थापित आहे.

पूर्वस्याम् दिशि निर्माणम् कृतम् तत् त्रिदशेश्वरैः ।
ततः परम् हेममयः श्रीमान् उदय पर्वतः ॥४-४०-५४॥
तस्य कोटिः दिवम् स्पृष्ट्वा शत योजनम् आयता ।
जातरूपमयी दिव्या विराजति स वेदिका ॥४-४०-५५॥


अर्थ: त्रीदशेश्वाराने पूर्व दिशेला ह्याचे (तालवृक्षाचे) निर्माण केले, त्याच्या मागे सोनेरी (हेममयः) उदय पर्वत आहे. त्याचे कोटी दिव्य स्पृष्ट हे शंभर योजने उंचीचे आहे, व जो सोनेरी दिव्य विराजित करतो.

इथे सुग्रीवाने पूर्व दिशेची ओळख म्हणून उदय पर्वतावर कोरलेल्या एका सोनेरी तालवृक्षाची खुण सांगितली आहे, आणी ही खुण दुसरे तिसरे काही नसून पेरू देशातला मधला 'Trident' आहे, व त्याचेच हे तंतोतंत वर्णन आहे. त्या पूर्वेच्याखुणेला कसे पोहचायचे ह्याचे वर्णन सुद्धा सर्ग ४० मध्येच आहे.





नदीम् भागीरथीम् रम्याम् सरयूम् कौशिकीम् तथा || ४-४०-२० ||
कालिंदीम् यमुनाम् रम्याम् यामुनम् च महागिरिम् |
सरस्वतीम् च सिंधुम् च शोणम् मणि निभ उदकम् ||४-४०-२१ ||
महीम् कालमहीम् चैव शैल कानन शोभिताम् |
ब्रह्ममालान् विदेहान् च मालवान् काशि कोसलान् ||४-४०-२२ ||
मागधाम् च महाग्रामान् पुण्ड्रान् अंगाम् तथैव च |
भूमिम् च कोशकाराणाम् भूमिम् च रजत आकराम् ||४-४०-२३ ||


अर्थ: (सुग्रीव विनत ला सांगतो) भागीरथी नदी ( बघ) ,रम्य शरयू नदी ,कौशिक नदी बघ. कालीन्दिम पर्वतातून वाहणारी नदी यमुना बघ तिचा उगम रम्य महागीरीत आहे. सरस्वती नदी पण बघ सिंधू नदी पण बघ आणी शोणाम नदी बघ ज्याचे पाणी मोत्या सारखे आहे. महिम नदी बघ कालमहिम बघ जे जंगलाने शोभित आहे, ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान (सारखी राज्ये) सुध्दा बघ. मागध सारखे महाग्राम बघ , पुण्ड्रान , अंगाम सुद्धा तिथेच आहेत. कोषकाराची ( कोषातून रेशीम उत्पन्न करणार्यांची) भूमी बघ , रजताची (चांदीची) भूमी बघ.



पूर्वेला कसे जायचे हे सांगताना सुग्रीव विंध्य पर्वताच्या उत्तरेस म्हणजे दक्षिण भारताच्या उत्तरेस आणी यमुना नदीच्या पूर्वेस असणाऱ्या सर्व प्रदेश सांगतो. ब्रह्ममालान , मालवान , काशी, कोसलान, मागध , अंगाम इत्यादी राज्ये सांगितल्यावर तो रेशीम उत्पन्न करणारे आणी चांदीची खाणी असणारे प्रदेश बघायला सांगतो. ह्या सर्वाचे वर्णन ऐकल्या वर हा प्रदेश म्हणजे आजचा ब्रम्हदेश वाटतो.

त्यापुढे त्याने जे वर्णन केले आहे, ते सयाम, चीन आणि जपान सारखे असून पढे प्रशांत महासागरातून दक्षिण अमेरिकेचे वाटते.

सध्या आपण प्रशांत महासागरातील काल्पनिक रेषा जी पूर्व मानतो, त्या पेक्षा हजारो वर्षान पूर्वी आपल्या पूर्वजांनी प्रशांत महासागरा पलीकडील पर्वत ही पूर्व मानून त्यावर 'तालवृक्ष' म्हणजे 'Trident' कोरला...



आपला,

(दिशाशोधी) विशुभाऊ

रविवार, २ जानेवारी, २०११

झिरो डायल

गेले ५ महिने वाचन आणि लिखाणाच्या बाबतीत माझे फार उदासीन गेले . पण मागील आठवड्यात थोडा व्यापातून मोकळा झालो आणि "Zero Dial" हे 'जे. डे' यांनी लिहीलेले व  'जयको पब्लीकेशन' यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचायची संधी मिळाली.
हे पुस्तक, पोलिसांचे खबरी (informers) आणि त्यांचे आयुष्य व त्यातिल संकटं ह्यांचा आढावा घेणारे सत्य घटणेवर आधारीत नव्हे सत्यघटणाच सांगणारे व एका पत्रकाराच्या द्रुष्टीने प्रकाश टाकणारे आहे.
तिन खबरी आणि पोलिस ह्यांनी केलेली कामे आणि त्यातिल फसवे व किळसवाणे राजकारण . . .  दाऊद- छोटा राजन ह्यांच्या टोळी युध्दात खबरींनी केलेली कामे. . . एक फार घाणेरडं जग जे ड्रग्ज, गुह्णे आणि कुंठणखाना ह्यांनी भरलेलं आणि त्यात शोधत जगणारा आशावाद. . .  भरतातील कुख्यात अतंकवादी रियाज़ भटकळ ह्याचा पाठलाग व खबरीं, पोलिस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी केलेली मेहनत. . . ह्या सगळ्या मुद्यांचा मेळ ह्या पुस्तकात फार सुंदर प्रकारे घातला आहे .
डे हे मुंबई मधले एक प्रसिध्द पत्रकार आहेत व त्यांच्या प्रतिभावंत लिखाणामुळे वाचनाची मजा काही ऒरच होती. . . .


आपला,
(वाचक) विशुभाऊ..

शनिवार, ३१ जुलै, २०१०

फलक

राजकारणामध्ये स्त्रीयांना १००% आरक्षण मिळावे ह्या विचार धारणेचा मी आहे, ह्याचे कारण म्हणजे रस्त्यावर लागणारे वाढदिवसाचे फलक; ह्या फलकां मधले चेहरे बघून मन उबगले आहे.
आज काल फ्लेक्स चे फलक कोणी ही बनवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.... ज्याला रोजच्या जिवनात रस्त्यावरचं काळं कुत्रही विचारत नाही तो कार्यसम्राट, ह्रुदयसम्राट वगैरे बनतो...... काही असेच फलक बघून मन उबगलेले होते आणि ह्याचाच विचार करत मला झोप लागली.... सकाळी झोपेतून उठून बघतो तर काय , माझ्या घरा समोर मोठा फलक लागलेला होता आणि त्यावर लिहीलेले होते...

थोरविचारवंत समाजसुधारक प्रबोधनकार विशुभाऊ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


शुभेच्छूक,


नाना , तात्या, बाळ्या, गोट्या आणि समस्त परिवार ....

.
.
.
.
आपला,

(प्रबोधनकार) विशुभाऊ .....

सोमवार, २६ जुलै, २०१०

संशोधन (ई.स. २९९९)

मराठी ह्या भाषेबद्दल इतिहासात भरपूर वाद होते असे संशोधनाअंती लक्षात येते. मराठी भाषा आणि मराठी भाषीक लोकं ह्यांच्या भवतालचे बरेच प्रवाद लिखीत स्वरूपात उपलब्द्ध आहेत.

मराठी ही जमात त्यावेळची सगळ्यात छळलीगेलेली किंवा सगळ्यात छळीक जमात होती (दोन विरोधाभासी प्रतिमा) व ह्या दोन्ही प्रतिमेबाद्दल अजुनही इतिहासात वाद आहेत. मराठी भाषेची सुरवात ही विसाव्या शतकातकाच्या उत्तरार्धात झाली असून ठाकरे आडणावाच्या कुटूंबाने ती केली असावी असे केलेल्या संशोधनाअंती वाटते.

त्यावेळच्या मराठी लोकांची आजूबाजूच्या सगळ्याच प्रदेशांशी भांडणे होती. तात्कालीन उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या गरीब प्रदेशातील लोकांवर त्यांनी मारहाण केली होती ,आंध्रप्रदेशातील लोकांचे पाणि अडवले होते, आणि कर्नाटक राज्यातील काही प्रदेश बळकवण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या घटणांना तेव्हा राजकारण म्हटले जात असे; ठाकरे घराण्यातील एका प्रसिध्द व्यक्तीचे नाव ’राज’ होते, व ह्या वरून ’राज’कारण हा शब्द तयार झाला असावा.
सुरवातीच्या काळात मराठी ही ईंग्रजी अक्षरं वापरून लिहीली जात असे, व तेव्हा ईंग्रजी अक्षरं ABCD ने चालू होत असत. त्या नंतर एकविसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनिकोड चा शोध लागल्यानंतर मराठी भाषेला आपली लिपी मिळाली, व त्या नंतर ईंग्रजी अक्षरांची QWERTY ने सुरवात होऊ लागली.

आपला,

(संशोधक) विशुभाऊ

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

वर्ल्डकप !!

शेतकरी राजा नेहमी प्रमाणे सकाळी पाच वाजता उठून मनन-चिंतन करत बसला होता.... बरेच दिवस त्याला मिळालेल्या विजया मुळे तो थोडा पेचात होता.....

राजा : कोण आहे रे तिथे ????

प्रधान : मी आहे साहेब, बोला काय काळजी आहे??

राजा : प्रधान, तुम्हाला माहीत आहेच एवढ्या मोठ्या खेळ समुहाचे अध्यक्ष-पद म्हणजे किती जबाबदारी , वरून आपले कृषी खाते!!!

प्रधान : साहेब, ही चिंता अपेक्षीत होती !

राजा : म्हणजे??? तुम्हाला सुध्दा वाटते, दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळू शकत नाही ????

प्रधान : साहेब, असे कसे होईल ???? मला एक सांगा , आज काल तुम्ही कोणाला गोट्या / विटी दांडू म्हणजे आपले लहान पणी चे खेळ खेळताना पाहीले आहे का?

राजा : नाही ...

प्रधान : अहो, आज कालची मुले क्रिकेट पण नाही खेळत !!!

राजा : मग करतात काय ही कार्टी ??????

प्रधान : साहेब, आपला देश हा कृषी प्रधान आहे ... ’फार्मविले’ खेळतात !!!

राजा : क्या बात है !

प्रधान : म्हणून आपण एक नवीन वर्ड्कप चालू करू ’फार्मविले वर्ड्कप’.... २०११ मध्ये हा वर्ड्कप पहीला आपल्या गावातच होईल !!!

राजा : ( एक टाळी आणि उडी मारून) प्रधानजी माझा रथ काढा !!!

आपला,
(प्रधान) विशुभाऊ ..

सोमवार, ७ जून, २०१०

कट्टा

कॉलेज कट्टा म्हणजे त्या वयातल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय.... कितीही टेंशन मध्ये असलो, तरी कट्यावर गेलो की कसे छान वाटे ,मग प्रसंग काही असो... घरचे प्रश्न, कॉलेज मधली ब्लॅक लिस्ट ते थेट प्रेम भंग , सगळ्याचे निवारण तिथेच धुरांच्या वलयांमध्ये आणि पानाच्या पिचकाऱ्यांमध्ये व्हायचे...

आज बऱ्याच वर्षांनंतर कट्ट्यावर जायचे ठरवले... जाताना बऱ्याच कल्पना रंगवल्या होत्या.... वाटले होते जुने सोयरे भेटतील, मजा मस्ती होईल... रंग्याचे जोक, भिक्या च्या थापा, बापट्याच्या कविता ऐकायला मिळतील..नविन जोमाचे नविन जवान आपला कट्टा रंगवत असतील... पक्या नेहमी प्रमाणे ऊधारी ची आठवण करून बिडी हातात टेकवत असेल..... मी खुप एक्सायटेड होतो... चालता चालता आतंर संपतच नव्हते, शेवटी तर धावत सुटलो, जवळ जवळ पाच एक वर्षांचे अंतर जे कापत होतो मी.... आणि जेव्हा पोहचलो तेव्हा मला जोराचा धक्काच बसला....

पक्या बिचारा कुठेतरी शुन्यात नजर लावून पानाला कथ्था लावत होता (कोणाच्या ठाऊक नाही).... कट्टा रिकामा होता, रंग्या-भिक्या तर नाहीच पण नविन पोरं सुध्दा नाहीत... पक्याला विचारले तर त्याने काही न बोलता हात पालथे करून दाखवले.... मी पण थोडे सावरण्या साठी सिगारेट सुलगवली आणि जुन्या आठवणीन मध्ये उभा राहीलो... तेवढ्यात कॉलेज ची काही मुलं माझ्या समोर ऊभी राहिली व अभ्यासा बद्दल बोलू लागली, मी दुर्लक्ष करणारच तितक्यात मला जाणवले की ही पोरं फ़ेसबुक आणि ट्विटर वर रात्री कट्टा जमवण्याच्या प्लॅन करत होते....

मला त्या पोरांची खुप किव आली ............. सिगरेट न पिणारी, तंबाखू न खाणारी, फक्त इंटरनेट वर मित्रांना भेटणारी ही नविन पिढी आपली संस्कृती, आपला कट्टा काळाआड गायब करणार; हे बघून माझे  ह्रदय तिळ तिळ तुटले.....

आपला,
(कट्यावरचा) विशुभाऊ

रविवार, ६ जून, २०१०

प्राध्यापकांचे इंग्रजी आणि मी , भाग - १

आमच्या ईंजिनिअरींग कॉलेज मधल्या प्राध्यापकांचे इंग्रजी म्हणजे नक्कीच एक संशोधनाचा विषय. खाली दिलेली जी उदाहरणे आहेत ती मी नविमुंबई मधल्या एका डिप्लोमा कॉलेज ला होतो तेव्हाची....

१) आमच्या वेळी डिप्लोमा्ला वार्षिक अभ्यासक्रम होता, माझे पहिलेच वर्ष... फिजीक्स (भौतीकशास्त्र) ह्या विषयाला आम्हाला पहिले सहा महिने कोणी शिक्षकच नव्हते. नंतर जे आले ते एकदम सहा फूट १०० किलो चे आजोबा. त्यांनी येताच आमचे प्रॅक्टिकल्स चालू केली.... आम्ही सगळे लॅब च्या बाहेर, रांगेत उभे होतो आणि सरोबा समोर टेबल वर बसलेले होते... ते तिथुनच ओरडले "रोल नंबर वन टू फ़िफटी हॅव एन्ट्री आदर हॅव डिसेंट्री" .... मी रणदिवे रोल नंबर ९० म्हणजे मला "डिसेंट्री".....

२) गणिताचा तास म्हाणजे हक्काचा मस्ती करायचा तास, त्या वेळी आमचे पुजारी सर फक्त फळ्या कडे बघून शिकवायचे, मागे वळून सुध्दा बघायचे नाहीत... पण त्या ऐतिहासीक दिवशी मी मस्तीत जाम सुटलो होतो आणि आमच्या सरांचा सुध्दा तोल सुटला, ते जोरात माझ्या वर ओरडले " रणदिवे स्टॅंडप" , मी चुपचाप स्टॅंडलो, व पुढिल आदेशाची वाट पहात होतो... पाच मिनीटे गेली सर माझ्या तोंडाकडेच बघत उभे, काही बोलेनाच.. अजुन पाच मिनीटांनी ते मला म्हणाले " फॉलो मी" ... मी चुपचाप त्यांना फॉलो करत दरवाजाच्या बाहेर गेलो व ते मला म्हणाले " नाऊ डोंट फॉलो मी".................

३) आमचे वैद्य सर म्हणजे त्यांच्या विषयातले गाढे-पंडीत, पण इंग्रजी हा त्यांचा नक्कीच विषय नव्हता... मला एकदा मेकॅनिक्स च्या प्रॅक्टिकल ला जायला उशीर झाला, वैद्यसर माझ्यावर भडकले व त्यांनी मला खडसावून विचारले
सर : " व्हाय लेट??"
मी : " ???????"
सर : " आय एम आस्किंग यू , व्हाय लेट??"
मी : " सर माय सायकल गॉट पंक्ट्चर, सो...."
सर ( समोर च्या मैदाना कडे बोट दाखवत): " नाउ रोटेट द ग्राउंड फ़ोर टाईम्स..."

मी आपला ग्राऊंड चार वेळा रोटेट करून परत सरां-समोर उभा राहीलो, सरांना कदाचीत माझी दया आली असावी ते मला म्हणाले " नाउ गो ऍंड अन्डरस्टॅंड द ट्री!!"

आपला,
(भयंकर इंग्रजी) विशुभाऊ

बुधवार, १२ मे, २०१०

टुगेदर

माणूस आणि  त्याचे मन , हा वर्षानु वर्षे  सुटलेला गुंता  तेच  मन ताब्यात ठेवण्यासाठी माणसानेच बनवलेली चाकोरी , धर्म बंधने वगैरे वगैरे.  ह्याच मनाचा एक  भाग म्हणजे सध्या गाजत असलेला कलम ३७७ म्हणजेच समलैंगीकताझिरो डिग्री प्रोडक्शन चे गौतम परब निर्मित नाटक 'टुगेदरम्हणजे हाच विषय.
ह्या नाटकात दोन लेस्बियन मैत्रिणीत्यांचे हळुवार संबंध  त्यांची मानसिकता फार सुंदर प्रकारे खुलवून दाखवलेली आहेहे नाटक म्हणजे फक्त समलैंगीकता नसून चाकोरी बाहेर विचार करणार्याचा  स्वतः चे अस्तित्व शोधणार्या एका व्यक्तीचा लढा आहेविनी ह्या पत्राला स्वतःला सिध्द करण्यासाठी काय काय करावे लागते आणि तिला आलेले अनुभवहे नक्कीच हृदयाला हात घालून जातात.
मी पाहिलेले 'टुगेदरनाटक हे प्रायोगिक नाटक होतेपण हे नक्कीच 'व्हाईट लिलीकिंवा तत्सम नाटकाच्या बरोबरीचे होईल ह्यात तुसभर सुद्धा संदेह नाही.

आपला,
(नाटकी) विशुभाऊ

सोमवार, ४ जानेवारी, २०१०

नवी पिढी

"तू मोठा होऊन कोण बनणार?"
"ST BUS Driver!!" .....

लहानपणी कोणीएका कुचकट माणसाने विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेले प्रामाणिक उत्तर , हो ! खरंच मला लहानपणी ST dirver होण्याचे त्याच्या सारखे भरपूर फिरण्याचे फार अपरूप होते..... आता ते आठवले की हसायला येते ... मूर्खपणाचे वाटते...

पण हाच प्रश्न आताच्या मुलांना आपण जेव्हा विचारतो तेव्हा ते थक्क करणारी उत्तरे देतात ... "हिप हॉप डान्सर होणार !" .... "बायोइन्फोटेक मध्ये संशोधन करणार".... च्या मारी टोपी ह्या वयात आम्हाला संशोधन हे फक्त न्युटन नामक जंतूचे काम असून तो आमच्या विज्ञानाच्या बापट सरांच्या पोटात राहतो असे वाटत असे... खरंच ही आजकालची नवीन पिढी किती फोकस आहे !!! त्यांचा अभिमान तर वाटतोच पण आपल्याला न्युनगंड पण आणतात ही पोरं.....

दोस्तांनो झपाट्याने प्रगत होणारी ही पिढी आपल्याला लवकरच म्हातारी करून निवृत्त करणार हे नक्की !!!

आपला,

(न्यूनगंडी निवृत्तीनाथ) विशुभाऊ ....

गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

टॅगी टॅगी....

कांचन ताईने टॅगले... नंतर विरू मग सिध्दार्थ, सगळेच टॅगी टॅगी खेळायला लागले... मला कळायला थोडा वेळ लागला ... पण शेवटी मी पण टॅगी....


1. Where is your cell phone?
कानाला आहे.

2. Your hairs?
माझे पांढरे झालेले केस मला गर्वाने फुलवतात आणि बायकोला चार-चौघात लाजवतात.

3. Your Mother?
प्रेमळ

4.Your Father?
शांत

5. Your favorite food?
मी शुध्द मांसाहारी आहे.

6. Your dream last night?
माझी Phd पुर्ण झाली.

7. Your favorite drink?
व्हिस्की ने लुटा मुझे , रम में क्या दम था ????? आपनी नय्या वहा डूबी जहा बियर का ड्रम था !!!!!!!!

8. Your Dream/Goal
सर्व विश्वात एकसंग operating system स्थापित करणे ( ह्याला मराठीत Universal Operating System म्हणतात.)

9. What room you are in?
अभ्यासाच्या खोलीत

10. Your hobby?
थोडे थोडके छंद असतील तर ना..... मुळात छंदिष्टच आहे मी ;-)

11. Your fear?
मर्द को डर नही लगता... हां कभी कभी घाबरताय !!!!!

12. Where do you want to be in next 6 years?
पुढील ६ वर्षांचे माहीत नाही... पण येत्या ६ महिन्यात इस्राईल, जॉर्डन व इजिप्त ला बायकोबरोबर जाण्याचा बेत आहे (व्हिजा मिळाला तर! आणि हो पैसे पण..).

13. Where were you last night?
गोड स्वपनात

14. Something you aren't diplomatic?
जे काही आहे ते तोंडावरती... नाही तर फाट्या वर.... डिप्लोमॅटीक होणे माझा स्वभाधर्म नाही.

15. Muffins?
कालखंडा बाहेरील प्रश्न.

16. Wish list item?
बिचारा देव थकला माझी लिस्ट बनवून......

17. Where did you grow up?
आईच्या पंखांखालीस व बाबांच्या कडेवर

18. Last interesting thing you did?
लग्न !!! त्या नंतर interesting  गोष्टींचा शेवट.... ;-)

19. What are you wearing?
वल्कले नेसणाऱ्यातला मी नाही.....

20. Your TV?
कार्टून नेटवर्क....

21. Your pets?
नाही.

22. Friends?
माझी बायको माझी सगळ्यात जवळची मैत्रीण.... किंबहूना आधी मत्रीणच होती....

23. Your life?
इनकंप्लीट विदाउट वाईफ.

24. Your mood?
झकास.

25. Missing someone?
हो..............

26. Vehicle?
मारुती अल्टो

27. Something you aren't wearing?
साडी...

28. Your favorite store?
कोणतेही पुस्तकालय...

29. Your favorite color?
लाल..

30. When was the last time you laughed?
काही मिनीटां पुर्वी.

31. Last time you cried?
’दमलेल्या बाबाची कहाणी...’ हे गाणे ऎकल्यावर.

32. Your best friend?
माझी सगळ्यात जवळ्ची मैत्रीण म्हणजे माझी बायको व सगळ्यात जवळचा मित्र प्रसाद

33. One place you go to over and over?
पुणे आणि कोल्हापूर

34. One person who mails me regularly?
कमीत कमी १०० जण आहेत... आजकाल मलाच वेळ नाही मिळत...

35. Favorite place to eat?
आईच्या हातचे जेवायला कोणतीही जागा चालते....

आता मी सौरभ , आनंद, हर्षल, मनमौजी, महेंद्र ,  ना आणि सर्व वाचकाना टॅगतो....

आपला,
(टॅगोरी) विशुभाऊ



रविवार, २० डिसेंबर, २००९

महाराष्ट्राचे द्विभाजन - त्रिभाजन.....


तेलंगणा नंतर पुन्हा स्वतंत्र-विदर्भ हा मुद्दा ऎरणीवर आला. वितरीत प्रशासना मुळे नक्की कसा फायदा कोणा एका प्रदेशाला होणार किंवा तोटा होणार ह्याचा ठोकटाळा लावणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलिकडचे असल्या मुळे मी ह्या विषयावर चार-चौघात आपले तारे तोडत नाही; पण काही दिवसांपुर्वी बाबासाहेबांचा ’महाराष्ट्राचे त्रिभाजन’ हा प्रबंध वाचला .... त्या वर हा लेख.

बाबासाहेबांच्या प्रबंधनातला प्रमुख मुद्दा हा मराठी लोकांच्या प्रगती साठी जस्तीत जास्त नेते देणे हा होता.... म्हणजे समजा महराष्ट्राचे तीन भाग केले तर एकुण तीन मराठी मुख्यमंत्री व उप-मुख्यमंत्री मराठी जनतेला मिळतील. खरे सांगायचे तर ह्याने काय साध्य होणार हे मला अजिबात कळले नाही, एक मुख्यमंत्री समजा ५ वर्षात ३०० कोटी कमवतो तर तिन मुख्यमंत्री १००-१०० कोटी कमवतील. आता ह्यात फक्त दोघांचा फायदा होऊन तिसऱ्याला २०० कोटींचे नुकसान दिसते, व बाकी सामान्य जनता जैसेथे !! ............

’नाशिक च्या मराठी माणसाला कोकणी माणसा बद्दल काय अपुलकी?’ हा बाबासाहेबांचा मुद्दा मला मनोमन पटला पण म्हणून काय वेगळे राज्य करायचे???? , अता मराठी माणसाला बिहारी बद्दल अपुलकी नसते म्हणून वेगळे राष्ट्र करायचे का???... कदाचीत मी रणदिवे असल्याने थोडाफार ’कम्युनीस्ट’ आहेच व मला हे कधीच पटणार नाही.....

त्यादिवशी कोणितरी सांगत होता की विदर्भातले शेतकरी आत्महात्या करतात त्याला सरकारचा विदर्भा च्या बाबतितला निष्काळजीपणाच कारणीभुत आहे... अरे तू जे आमदार-खासदार निवडून दिलेस ते काय .....???? की ते फक्त स्वतंत्र ( आताही विदर्भ पारतंत्रात नाही) विदर्भा नंतरच काम करणार????

कोणतेही मुद्दे हे खंडी करणाने सुटणार नसून , केवळ आपापसातले राजकारण, व हेवेदावे वाढवणार आहे. मला माझ्या विवीधतेने नटलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान आहे व तो संयुक्त ठेवण्यासाठी मी माझ्या शरिरातल्या शेवट्च्या रक्तथेंबा पर्यंत लढा देईन.....

आपला,
(संयुक्त-मराठी) विशुभाऊ.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

कसाब ला मृत्यूदंड कसा द्यावा ?

दोस्तांनो,

आज २६/११ च्या पार्श्वभुमीवर मी, बाळासाहेबांनी आणि तात्यासाहेबांनी बऱ्याच वेळ कसाब ला फाशी सारखे सुखासुखी मरण न देता कशा प्रकारे तडपवून तडपवून मारावे ह्या वर मंथन केले... कोणतीही मनाला शांती देणारी पध्दत मिळाली नाही....
कृपया आपणास कोणतीही पध्दत सुचवायची असल्यास कळवावे...

आपला,
(पछाडलेला) विशुभाऊ

बुधवार, ११ नोव्हेंबर, २००९

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

देश आणि धर्मं

काही कट्टर  मुसलिम संघटणांनी घातलेला  ' वन्दे मातरम' चा वाद वाचला आणि डोके फिरले .... भोसडिच्यानो देशा आधी तुमचा धर्मं येणार असेल तर तुम्हाला देशद्रोही बोलले पाहिजे .... जा न मग इथून जिथे वन्दे मातरम बोलावे नाही लागणार तिथे .... ज्याच्या मानत देशा आधी धर्म येतो तो देशाद्रोहिच आहे मग तो मुसलिम असो की हिन्दू ....
आपला,
(देशाभिमानी) विशुभाऊ

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

भुताटकी - भाग १

आमचा मुलूंड्ला वाडा होता, पण माझ्या बाबांना एकूण ४ भाऊ व ५ बहिणी. एकेकाची लग्न झाल्यावर तो वाडा पण कमी पडू लागला. जेव्हा आई-बाबांचे लग्न ठरले, तेव्हा बाबांनी नविनच बनलेल्या गगनचुंबी 'शितलदर्शन'नावाच्या इमारतीत ७ व्या मजल्यावर घर घेतले.

शितलदर्शन जिथे बांधली आहे त्या भागाला पुर्वी '७ माड'असे बोलत व तिथे कैद्यांना फाशी दिली जात असे. सात-माडला भुत असतात अशी गावकऱ्यांची श्रध्दा असल्याने दिवसा ढवळ्या पण तिथे कोणी फिरकत नसे व चुकून मुले खेळता खेळता गेलीच तर ते बाधा घेऊन येत असत!.. अ्शा ह्या ७-माड मघ्ये बांधलेल्या इमारतीच्या ७व्या मजल्या वरचे ७वे घर बाबांनी विकत घेतले.....

माझे बाबा मुळातच बेडर स्वभावाचे, व त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता... पण माझी आई तितकीच भित्र्या स्वभावाची, म्हणूनच कि काय बाबांनी आईला त्या जागेचा इतीहास काहिच सांगितला नव्हता.... लग्ना नंतर सुरवातीला आई-बाबा तिथे न रहता वाड्यावरच रहात होते... वर्षा दिड वर्षात माझ्या जन्मानंतर आम्ही तिघे शितलदर्शन मध्ये राहिला गेलो आणि ते थरारक नाट्य सुरू झाले...........

आई ला घरात काम करताना सारखे अजुन कोणी बरोबर असल्याचा भास होत असे; नविन घर आहे त्यामुळे होत असेल असे वाटून काही दिवस चुप्प बसली.... पण नंतर मी जेव्हा घरात घाबरू लागलो ओरडू लागलो , तेव्हा आईचा विश्वास बसला की काहितरी गोंधळ आहे.... त्यातच मी डायरीयाने आजरी पडलो व हॉस्पिट्ल मध्ये होतो, तेव्हड्या काळात ह्या विषयावर पडदा पडला. एकमहिन्या नंतर जेव्हा मला घरी आणले त्याच रात्री आईने बाबांना ही गोष्ट सांगितली.... व बाबांनी ती हसण्यावारी नेली.... थोड्या वेळाने बाबा धुतलेले कपडे वाळत घालत होते तेव्हा आई मागुन आली व पुन्हा तोच विषय काढून बोलू लागली, व बाबा आईची समजूत घालत होते आणि तितक्यात आतून आईचा आवाज आला " अहो, कोणाशी बोलता आहत ?" बाबांना नखशिकांत शिरशीरी गेली व बाबांनीमागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते आजुबाजूला.......

आता बाबांचा पण विश्वास बसला होता की कहितरी गोंधळ आहे!... ते पण शहारले.... त्यानी आईला वचन दिले की आपण लवकरच दुसरे घर घेऊ.............. आता बाबा कामवर गेल्यावर आई मला कुशीत आणि स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसत असे, कधी संध्याकाळ होते आणि बाबा घरी येतात त्याची ती वाट पहात असे........ घरा मध्ये भांडी पडणे, खिडक्यांच्या काचा फूट्णे, आवाज येणे, सारखी प्रेतयात्रा दिसणे हे प्रकार चालूच होते .....

एकदा माझी मावस बहीण आमच्या कडे राहीला आली होती.... दुपारी माझ्याशी खेळता खेळता ती जोरात किंचाळली तेव्हा आईने धावत येऊन विचारले की काय झाले?, त्या वर ती ने सांगितलेली गोष्ट ऎकून आई थंडच पडली... तीला एक म्हातारी बाई दिसत होती व ती जवळ बोलवत होती... आईने लगेच आम्हाला घेतले व तडक वाड्यावर नेले... !

बाबांनी काही दिवसात कळव्या मध्ये दुसरा फ्लॅट घेतला , आमचे सगळे सामान तिथे शिफ्ट केले फक्त आईच्या आग्रहाने बाबांनी आमच्या कुलस्वामीनीची कालिकामातेची तस्बिर दारावर ठेवली.... ती रात्र आमची शितलदर्शन मधली शेवटची रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही नविन जागेत राहिला जाणार होतो... त्या रात्री आम्ही झोपलेलो असताना बाबांना कोणीतरी डिवचत आसल्या सारखे वाट्ले , म्हणून उठून पाहिले तर एक म्हातारी बाबांना डिवचत होती व रागा रागाने बघत होती, बाबा घाबरले पण स्वतःला सावरत त्यांनी आम्हा सगळ्यांवर हात ठेवला व त्या म्हातारी वर ओरडले व तीला चालते होण्यास सांगितले... त्या म्हातारी ने आम्हाला मारण्याचा पण केला होता पण बाबा पण हट्टाला पेटले होते.... ते तिच्या शी तावातावाने भांडत होते... तिच्यावर ऒरडत होते.. तिला शिव्या देत होते... ह्या सगळ्या आवाजात आईला जाग आली व ऊठून तिने जे दृष्य पाहिले त्याने तिची गाळण झाली... त्या म्हातारीने आई कडे मोर्चा वळवला... ती आईला सारखी दरवाज्यावरची देवीची तस्बीर काढायला सांगत होती, व बाबा तीला आडवत होते... म्हातारीला भिती दाखवत होते... ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा पहिला कोंबडा अरवला तेव्हा ती म्हातारी गायब झाली व आई-बाबा आम्हाला घेऊन कळव्याला आले .... त्या नंतर आई-बाबांनी परत कधीच त्या इमारती कडे वळून पाहिले नाही....

आजही जेव्हा मी वाड्यावर जातो तेव्हा लांबून ती इमारत बघतो... ती तशीच भकास अजूनही उभी आहे !!!!

आपला,

(भुताड्या) विशुभाऊ

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार,

तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.

आपला,
(शुभचिंतक) विशुभाऊ

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

बाबा

    आज सिध्दार्थ च्या सांगण्यावरून पुर्वी न उमगलेल संदिप चे " दमलेल्या बाबाची कहाणी" हे गाणे आई ऎकले, खरच काळीज फाडणारे गाणे आहे. खरेतर हे गाणे म्हणजे संदिप ने स्वतःच्याच गाण्याला "दूरदेशी गेला बाबा..." ला दिलेले उत्तर.... आता बाबा झाल्यावर त्या पद्यातील दर्द, आणि आश्रू कळले....

    आज काल घरातील आई आणि बाबा हे दोघेही नोकरी करतात आणि त्यामुळे ज्या बाळाला जास्त गरज असते, त्यालाच वेळ देऊ शकत नाही.... संदिप च्या कवितेतली छोटी मुलगी ,आई वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झालेली.... बिचारी एकटीच घरी...

        कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
        चार भिंतित धावुन दिसभर दमवला
        ' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही ॥
लहान असताना, माझी आई दुपारी मला जवळ घेउन ’आता पुरे ! झोप सोन्या...’ बोलायची.... पण माझ्या सोनाला तर मी पाळणा घरात ठेवले !

        कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
        कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
        खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही ॥
शाळेला सुट्टी म्हणजे मजा असे वाटणारा मी... पण माझी पोर सुट्टी च्या नावने खिन्न होते कारण.. तेच "खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही"...


        दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
        दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
        फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही ॥
मी लहान असताना वाटेल तेव्हा आई-बाबांचे बोट धरून बाहेर फिरायला जात असे, पण माझ्या छोटीच्या मुठीमध्ये मात्र माझे बोट नाही..

        नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
माझ्या पोरीच्या डोळी झोप दाटली आहे.... आणि मी द्रुष्ट घरी नाही.....

ह्या सर्व दिवसात स्वतःच दमून भागुन माझी परी झोपली... आणि मी घरी येतो व चालू होते "दमलेल्या बाबाची कहाणी"......

संदिप तुला त्रिवार सलाम !!!!!!!!

आपला,
(एक बाबा) विशुभाऊ..

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

निवड्णूक !

    ह्या निवडणूका आल्याकी मला जरा धडकीच भरते, जस जशी निवडणूकेची तारिख जवळ येते तस तशी हि ५ वर्ष बॅनरवर दिसणारी साहेब, नाना, तात्या, बंटी, भाऊ, कार्यसम्राट, ह्र्दयसम्राट वगैरे मंडळी आमच्या घरची धूळ झाडायला येतात. कोण जाणे कसे पण येताच नावाने हाक मारून आदबिने नमस्कार सुध्दा करतात, व मी नियमीत पणे त्यालाच कसे मत देत आलो आणि येणार हा प्रत्येकाला विश्वास देतो.....

    दर निवडणूकीला घरी आलेल्या उमेदवाराला मत देण्याच्या आश्वासनांची टेप माझी चोख पाठ असते, व त्यात (टेप वाजवण्यात) मी कधीच चुकत नाही. पण गेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या वेळी मोठा गोंधळ झाला, त्याचे झाले असे की आमच्या मतदार संघातल्या धडाडिच्या आणि तरूण कर्यकर्त्या सुंदराबाई ( sorry ताई) भरदुपारी आमच्या घरी आपल्या पाळलेल्या इमानदार लोकांना घेऊन आल्या. मी नुकताच ऊठलो होतो आणि घरात कोणिही नसल्याने स्वतःच चहा बनवण्याची तयारी करत होतो. ’आल्या अथित्या मुठ्भर द्याया मागे पुढती पाहू नको!’ ह्या आनंद फंदिंच्या फटक्याला जागुन त्यांना चहा विचारला व ते सगळे जण एक सुरात ’हो’ बोलले.... आता झाली ना पंचाईत ! दुध फक्त २ कप चहाचे आणि हे बाई व इमानदार पकडुन १५ जण... त्यातल्या त्यात एक गरिब इमानदार पकडला व त्याला पैसे देऊन बिल्डींग खालच्या भट कडून १६ कप चहा मागवला.... आता ह्या बाईंनी ताबा घेतला व आपण केलेल्या कामाची उजळणी चालू केली, माझ्या घराचा हॉल म्हणजे व्यासपिठ झाले होते... ही बाई आणि माझ्या पोटातले कावळे एकजात एकसुरात ओरडत होते... तितक्यात तो गरिब इमानदार आला व माझी त्या भाषणातून सुटका झाली... मी त्या बाईंना विश्वास दिला की हे मत तुम्हालाच मिळणार , तसेही आपले संबंध (वैयक्तिक) खुप जुने आहेत... त्यावर बाई खुश होऊन निघुन गेल्या...

    सुंदराबाई जातात न जातात तोच त्यांचे खंदे विरोधक अण्णासाहेब दरवाज्यात उभे !..... आता हे अण्णासाहेब म्हणजे तेव्हा होणाऱ्या आणि आताच्या झालेल्या सासरचे , मान ठेऊन त्यांना पण आत बोलवले व त्यांनी लाजेखातर का होईनात पण चहा नाही सांगितला.... परत तेच बोलणे चालू झाले... ह्यांनी गटार साफ केली तर त्यांनी कचरा कुंड्या लावल्या... ह्यांनी स्मशानाची जागा वाढवली तर त्यांनी विद्युतदहनीका लावली... मी ह्यांना पण मत देण्याचे आश्वासन देतच होतो की सुंदराबाई त्यांचा राहिलेला मोबाईल घ्यायला आल्या!!!.... खप्प... माझी बोलतीच बंद झाली...

बाई गरजल्या : ’अण्णासाहेब, विशुभाऊ फितणार नाहीत ! आमचे संबंध जुने आहेत !’
अण्णासाहेब:  संबंध ?? बाई आमच्या होणाऱ्या जावयावर नसते आरोप सहन नाहि करणार!! याद राखा !!!
सुंदराबाई : काय हो ...... मतदान करणे हा काय नसता आरोप आहे का??? काल रात्री कुठे होतात हे मला बरोबर माहित आहे ....
अण्णासाहेब: @#%^$&$$%&%*
सुंदराबाई: *^^*(%$#%

मी डोक्याला हात लावला.... त्यांना दोघांना शांत करत मी सांगितले " तुम्ही दोघांनी सुध्दा समाजासाठी खुप काम केले आहे !, पण दुर्देवाने मी उद्याच २ महिन्या साठी परदेशी जात आहे, तेव्हा कृपाकरुन भांडण थांबवा, व कोणीही निवडून आले तरी मला आनंदच आहे!" त्यावर दोघेजण मला शिव्याशाप देत निघुन गेले, व माझी सुटका झाली.....

आपला,
(मतदाता) विशुभाऊ